आमदारांनी उपस्थित केला थकीत ऊस बिलांचा प्रश्न

बस्ती : विधानसभेतील अतारांकीत प्रश्नांच्या माध्यमातून रुधौलीचे आमदार संजय प्रताप जयस्वाल यांनी सहारा बँकेसोबतच ऊस बिलांचे वितरण आणि भानपूर नगर पंचायत भवनासंदर्भातील जनहिताचे तीन प्रश्न उपस्थित केले.

बस्ती जिल्ह्यातील सहारा बँक शेतकऱ्यांनी जमा केलेले पैसे परत का दिले जात नाहीत अशी विचारणा त्यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. नवसृजित नगर पंचायत भानपूरमध्ये कार्यालय नसल्याबद्दलही त्यांनी विचारणा केली. कार्यालयाची स्थापना कधी केली जाईल आणि कर्मचारी नियुक्ती कधी होणार याची विचारणा त्यांनी केली. नगरविकास मंत्री आशुतोष टंडन यांनी भानपूर नगर पंचायत परिसराचे स्थायी कार्यालय भानपूर तहसीलमध्ये कार्यरत आहे. कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी २.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रशासकांच्या रुपात प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी गरजेनुसार घेतले जात आहेत.

अठदमा साखर कारखान्याच्या ऊस बिलांच्या थकबाकीबाबत विचारलेल्या प्रश्नांबाबत ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, अठदमा साखर कारखान्याची आर्थिक स्थिती खराब असल्याने साखर कारखान्याला बँकेकडून कॅश क्रेडिट लिमिटला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांचे पैसे देण्यास उशीर होत आहे. साखर कारखाना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास कटिबद्ध आहे. राज्य सरकार उर्वरीत पैसे देण्यासाठी सजग असल्याचे मंत्री राणा म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here