मोहिउद्दीनपुर साखर कारखान्यानेही भागवली शंभर टक्के थकबाकी

मेरठ: डीएम यांच्या कडक निर्देशानंतर आता मोहिउद्दीनपुर साखर कारखान्यानेही 2019-20 ची थकबाकी शंभर टक्के भागवली आहे. याप्रमाणे आता किनौनी साखर कारखाना सोडून उर्वरीत पाच साखर कारखान्यांनी सर्व थकबाकी भागवली आहे. मोहिउद्दीनपूर कारखान्याने एकूण 199 करोड 92 लाख 30 हजार रुपयांचे देय भागवले आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण सहा साखर कारखाने आहेत. आतापर्यंत दौराला, नंगलामल, सकौती आणि आता मोहिउद्दीनपुर साखर कारखान्याने 2019-20 ची शंभर टक्के थकबाकी भागवली आहे. मोहिउद्दीनपुर साखर कारखान्याचे प्रभारी प्रधान व्यवस्थापक हरपाल सिंह यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये 61 लाख 80 हजार 719 क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. कारखान्याकडून थकबाकी जवळपास आठ करोड रुपयेही भागवण्यात आले आहेत. याप्रमाणे एकूण 199 करोड 92 लाख 30 हजार रुपये भागवल्याने कारखाना थकबाकीमुक्त झाला आहे. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, मवाना साखर कारखान्यानेही जवळपास 14 करोड रुपयांची थकबाकी भागवली आहे. आता केवळ किनौनी कारखान्यावरही शेतकर्‍यांचे देय बाकी आहे. उर्वरीत सर्वांनी थकबाकी भागवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here