शेतकर्‍यांनी ट्रंच पद्धतीने ऊस लागवड केल्यास अधिक फायदा

अमरोहा : दढियालमध्ये त्रिवेणी साखर कारखान्याचे मालक नारायणपूर चे महाव्यवस्थापक भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी ऊस लागवड ट्रंच पद्धतीने करावी. यामुळे कमी मूल्यात अधिक फायदा होवू शतो. इस्लामपुर मधील पलविदर सिंह यांच्या शेतामध्ये ऊस लागवडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सर्व शेतकर्‍यांना 0238 प्रजातिच्या ऊसाची लागवड करण्याचे आवाहन केले.

अपर महाव्यवस्थापक टीएस यादव यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी शरदकालीन ऊस लागवडीसह सहपीकाच्या रुपात बटाटा, लसून आदीचीही लागवड करावी. यामुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा होईल. याबराबेरच ऊसाच्या रोपांवर माती चढवावी आणि त्यांची बांधणीही आवश्य करावी. यामुळे ऊस पडणार नाही. यावेळी सहायक महाव्यवस्थापक लवकुश चौहान, सहायक ऊस व्यवस्थापक राजकुमार सिंह, वरिष्ठ ऊस अधिकारी सतिश चौहान तसेच राजवीर सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here