साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ४ डिसेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील एकूण १७३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ८६ सहकारी आणि ८७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सोलापूर विभागात ४१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक खासगी कारखाने गाळप करीत आहेत. यामध्ये २६ खासगी आणि १५ सहकारी कारखान्यांनी गाळप केले होते.
महाराष्ट्रात ४ डिसेंबरअखेर २४५.५२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात २२७.३८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात सरासरी साखर उतारा ९.२६ टक्के आहे.
सोलापूर विभागात ५७.६० लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर ४८.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.४८ टक्के आहे