महाराष्ट्रात सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखाने सुरू

महाराष्ट्रात प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. ३० नोव्हेंबर अखेर सोलापूर विभागात सर्वाधिक ४१ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार ३० नोव्हेंबरअखेर सोलापूर विभागात ५१.८९ लाख टन उसाचे गाळप करून ४२.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.२६ टक्के आहे.

सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखाने गाळप करीत असूनही राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत ५८.५४ लाख टन उसाचे गाळप करून ६१.०९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा साखर उतारा १०.४४ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ३० नोव्हेंबरअखेर महाराष्ट्रात एकूण १७२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ८६ सहकारी तर ८६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत २२२.४ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर २०३.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१५ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here