खासदार सत्यापल सिंह यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, साखर कारखान्यांना केली थकबाकी भागवण्याची मागणी

बागपत : खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी सीएम योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मलकपूर, मोदीनगर आणि किनौनी साखर कारखान्यांकडून उस थकबाकी लवकरात लवकर भागवावी अशी मागणी केली. तसेच कासिमपूर खेडीपर्यंत मेट्रो आणि रैपिड ट्रेन चालवण्याचीही मागणी केली. खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, लखनऊ मध्ये भेटी दरम्यान लोकसभा क्षेत्रातील मुद्दे मांडले. जिल्हा मुख्यालयावर बस अड्डयाची निर्मिती, बागपत साखर कारखान्याचे विस्तारीकरण, दिल्ली मेरठ हायवे वर भोजपूर ब्लॉक, मोदीनगर विधानसभेतील शेतकर्‍यांनाही इतर क्षेत्रानुसार समान अनुपातमध्ये भरपाई, चिरचिटा मध्ये हिंडन नदी वर पुलाची मागणी करण्यात आली. याशिवाय दिल्ली पासून कासिमपूर खेडीपर्यंत रैपिड रेल किंवा मेट्रो सुरु करण्याबाबत मागणी करण्यात आली. अमूल दूधाच्या प्लांटचे काम लवकर पूर्ण केले जावे, प्रस्तावित रस्त्यांचे काम पूर्ण केले जावे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, चौपदरीकरण लवकर केले जावे अशा मागण्या करण्यात आल्या.

सीएम यांनी ग्वाही दिली की, थकबाकी लवकरात लवकर भागवली जाईल आणि इतर कामेही पूर्ण केली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here