मुजफ्फरनगर: ऊस बिले थकबाकीबाबत साखर कारखान्यांना कारवाईचा इशारा

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्याबाबत आणि थकबाकीचा मुद्दा संपविण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर कठोर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. राज्यातील बहुतांश कारखाने शंभर टक्के ऊस बिले देण्यास अपयशी ठरले आहेत. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत.

चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सर्व डिफॉल्टर कारखान्यांनी पुढील गळीत हंगामाच्या सुरुवात करण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत असे आदेश दिले होते.

याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी मंगळवारी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीचा आढावा घेतला. जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. त्रिवेदी यांनी सांगितले की, आठ साखर कारखान्याच्या मालकांपैकी चार कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे अदा केले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here