नारायणगड साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन समाप्त

अंबाला : नारायणगड साखर कारखान्याच्या कामगारांनी पगारवाढीचे आश्वासन आणि त्यांच्या इतर मागण्या मान्य झाल्यानंतर जवळपास १६ दिवसानंतर बेमुदत आंदोलन समाप्त केले. उसाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी काही आठवडे आधी शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त झाले. ज्येष्ठ संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चारुनी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कामगार संघ आणि अंबाला, पंचकुला येथील शेतकऱ्यांनी कारखान्याजवळ एकत्र येऊन परस्पर सहमतीने निर्णय घेतला. हरियाणा कृषी विभागाचे अतिरिक्त ऊस आयुक्त जे. एस. बराड, उपजिल्हाधिकारी नीरज आणि कारखान्याचे मालक राहुल आनंद हे यानंतर उपस्थित होते.

हिंदुस्थान डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, चारुनी यांनी सांगितले की, आम्ही ऊस थकबाकीबाबत कारखान्याच्या मालकांवर विश्वास ठेवू शकत नाही. आम्ही सरकारला भेटू इच्छितो. त्यांनी कारखाना ताब्यात घ्यावा अथवा विक्री करावी. आम्ही चार ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्यात येईल. कर्नाल प्रमाणे आंदोलन केले जाईल. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर २५ नोव्हेंबरपर्यंत कारखान्याचे काम सुरू करावे अशी मागणी चारुन यांनी कारखान्याच्या मालकांकडे केली. पंचकुलामध्ये ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचे जाहीर केलेले आंदोलन शेतकऱ्यांनी कारखान्याच्या मालकांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित केले.

उपजिल्हाधिकारी नीरज म्हणाले, कारखाना प्रशासन देखभाल आणि इतर गरजेपोटी निधी उपलब्ध करण्यास तयार झाले आहे. कारखाना वेळेवर सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नारायणगडचे उपायुक्त म्हणाले, कारखान्याच्या कामकाजाची सरकारी अधिकाऱ्यांकडून देखभाल केली जाईल. मात्र, थकबाकीची व्यवस्था मालकाला करावी लागेल. आम्ही सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करू.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here