शरद पवार यांचे पंतप्रधांना पत्र; म्हणाले साखर उद्योगाला तात्काळ मदतीची गरज

मुंबई :माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनो व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील लॉकडाऊनमुळे प्रभावित साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, आर्थिक तरलतेच्या समस्येने त्रस्त असलेल्या साखर उद्योगासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष सहाय्य पॅकेज उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, साखरेची किमान विक्री किंमत ग्रेड नुसार 3450 ते 3750 पर्यंत वाढवून द्यावी. गेल्या दोन वर्षांमध्ये कारखान्यांमध्ये जितक्या ऊसाचे गाळप झाले आहे त्या ऊसाला एक टनामागे 650 रुपये अनुदान द्यावे. त्याचबरोबर निर्यात प्रोत्साहन अनुदान दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, ते ताबडतोब मिळावे. साखरेचा साठा करण्यासाठी केंद्राकडून दोन वर्षांचा खर्च मिळालेला नाही, तो तात्काळ द्यावा. कारखान्यांवरील कर्जाचे पुनर्गठन करावे. त्याचबरोबर इथेनॉलच्या अधिक उत्पादनासाठी डिस्टलरीसाठी कर्ज मिळावे.

पवार म्हणाले, भारतीय साखर उद्योग आधीच साखर मागणी आणि ऊस थकबाकीच्या संकटात सापडला आहे. आता कोरोनो व्हायरसने देखील संपूर्ण पुरवठा साखळी चिंताजनक बनविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here