बिजनौर: ऊस थकबाकी शेतकऱ्यांना हवी रोखीत, साखर घेण्यात रस नाही

बिजनौर : उत्तर प्रदेश च्या बिजनौर जिल्हयातील शेतकऱ्यांना ऊस थकबाकी च्या ऐवजी साखर घेण्यात रस नाही. साडे तीन लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केवळ 15 हजार क्विंटल इतकीच साखर खरेदी केली आहे. अनेक साखर कारखाने साखरही देत नाहीत. या साखर कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे. कारखान्यांकडून साखर घेण्याची मुदतही 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची थकबाकी ही प्रलंबित आहे. कारखान्यांच्या गोदामात साखर भरलेली आहे. साखरेला गोदामातून काढण्याासाठी आणि शेतकऱ्यांची थकबाकी कमी करण्यासाठी शासनाने साखर कारखान्यांना एक क्विंटल साखर प्रति महिना देण्याचे निर्देश दिले होते.

एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेला हा शासन आदेश 30 जून पर्यंत लागू राहणे आवश्यक होते. शेतकरी जी साखर कारखान्यातू खरेदी करतात त्याची किंमत थकबाकीतून कापण्यात आली. शासनाने ही मुदत वाढवली आहे. आता शेतकरी 15 ऑगस्टपर्यंत प्रति महिना एक क्विंटल साखर घेउ शकतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here