साखर कारखाने फायद्यात आणण्यासाठी उपपदार्थ निर्मितीची गरज: शरद पवार

नाशिक : शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी असा आग्रह राज्य सरकारने करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. स्थानिक आमदार दिलीप बनकर यांनी रणवाड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळपास हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आल्यानंतर त्यांनी या मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये पवार यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. सहा वर्षानंतर हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, साखर कारखान्यांना व्यवहार्य आणि फायदेशीर बनविण्यासाठी उप पदार्थांची निर्मिती करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होईल. पवार म्हणाले, वीज, इथेनॉल आणि हायड्रोजन उत्पादनाकडे लक्ष दिल्यास साखर कारखाने फायद्यामध्ये येऊ शकतात. तसे झाले तर शेतकऱ्यांना आपल्या पिकाला चांगला दर मिळवता येईल.

सध्या जगातील सर्वात मोठे साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझील आणि थायलंडमध्ये साखर उत्पादनात घसरण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची मागणी वाढली आहे. त्यामुळे यंदा साखर निर्यातीसाठी चांगली संधी आहे, असे पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here