नेपाळ: थकबाकीच्या बाबतीत साखर कारखानदारांना केली जाणार अटक

काठमांडू: उस थकबाकी भागवण्यात अपयशी ठरलेल्या कारखान्यांविरोधात उस शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनकर्त्यां उस शेतकर्‍यांनी रविवारी उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री लेखराज भट्टा यांना एक निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून उस शेतकर्‍यांना पैसे भागवण्यासाठी कारखाने आणि सरकारलाही अल्टीमेटम दिले आहे. शेतकर्‍यांनी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सरकारला अल्टीमेटमही दिले, जेणेकरुन साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना थकबाकी भागवावी. त्यानीं सणासुदीच्या पूर्वी थकबाकी पूर्ण न भागवल्यास 12 डिसेंबरला रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

उस शेतकरी संघर्ष समिती, सरलाही चे संरक्षक राकेश कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वामध्ये शेतकर्‍यांच्या एका टीम ने उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री लेखराज भट्टा यांची भेट घेतली आणि निवेदन देवून सांगितले की, यावर्षी सुरुवातीला सरकारकडून लिखित प्रतिबद्धता आतापर्यंत नाही झाली. शेतकर्‍यांनी सांगितले की, आम्ही थकबाकी न मिळाल्याने नाइलाजाने निर्णायक आंदोलन करु. मंत्री भट्टा यांनी लवकरात लवकर आपल्या मुद्द्यांना सोडवण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी सांगितले की, आम्ही त्या साखर कारखानदारांना अटक करण्यासाठी गृह मंत्रालयाला एक परिपत्र जारी करु ज्यानीं आतापर्यंत शेतकर्‍यांना पैसे दिलेले नाहीत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here