नेपाळ: साखर कारखाना बंद झाल्यानंतर शेतकर्‍यांना ऊस थकबाकीची चिंता

काठमांडू, नेपाळ: ऊस शेतकर्‍यांनी बंद पडलेल्या श्री राम साखर कारखान्याकडून आपल्या उर्वरीत थकबाकीसाठी सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कारखाना 26 जुलैपासून बंद आहे, ज्यामुळे ऊस शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकर्‍यांनुसार, एकट्या रौतहट जिल्हयातील ऊस शेतकर्‍यांचे 410 मिलियन रुपये देय आहेत. रौतहट येथील गरुडा मध्ये संचालित सर्वात मोठे साखर निर्मात्यापैकी एक, श्री राम साखर कारखान्यांनी जवळपास अडीच महिने पहिल्यांदा आपले दिवाळे निघाल्याची घोषणा केली. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या आर्थिक घाट्यचा दावा करुन कंपनीच्या व्यवस्थापनाने कारखान्याला स्थायी रुपात बंद करण्याची घोषणा केली.

संसदीय उद्योग, वाणिज्य, श्रम आणि उपभोक्ता कल्याण समितीला एक निवेदन देवून शेतकर्‍यांच्या एका समूहाने सरकारकडून थकबाकीचा मुद्दा सोडवण्यासाठी पाउल उचलण्याची मागणी केली. शेतकर्‍यांशिवाय, कारखाना व्यवस्थापनाकडून आपल्या कर्मचार्‍यांचे 40 मिलियन रुपये देय आहेत. शेतकर्‍यांच्यानुसार, कारखाना मालक, शेतकरी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना सांगत आहेत की, कारखान्याची संपत्ती विकल्यानंतरच त्यांचे पैसे भागवले जातील. रौतहट जिल्ह्यामध्ये जवळपास 18,000 ऊस शेतकरी आहेत. शेतकर्‍यांनी सरकारकडून साखर कारखान्याच्या पुनरुद्धार करण्याची मागणीही केली.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here