नेपाळ: चार साखर कारखान्यांकडून 481 मिलियन रुपये देय

काठमांडू: उस शेतकर्‍यांचे आतापर्यंत श्री राम साखर कारखाना, अन्नपूर्णॉ साखर कारखाना, इंदिरा साखर कारखाना आणि लुंबिनी साखर कारखान्याकडून 481 मिलियन रुपये देय आहेत. उस शेतकर्‍यांनी थकबाकी भागवण्यासाठी साखर कारखान्यांवर दबाव टाकला आहे. उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयानुसार, श्री राम कारखान्याकडून शेतकर्‍यांना 350 मिलियन रुपये देणे बाकी आहे. याप्रकारे अन्नपूर्णा साखर कारखान्यांवर 170 मिलियन, लुंबिनी वर 84.1 मिलियन आणि इंदिरा कारखान्यावर 47 मिलियन रुपये अजूनही देय आहेत. जवळपास प्रत्येक वर्षी, साखर कारखाने उस शेतकर्‍यांना वेळेत पैसे भागवण्याचे अश्‍वासन देवून ते तोडतात. शेतकर्‍यांना सतत आपल्या पैशासाठी आंदोलने, निदर्शने करावी लागतात.

शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा श्री राम साखर कारखाना जुलैपासून बंद आहे. नुकसान झाल्याच्या नावावर शेतकर्‍यांना त्यांचे पैसे न भागवताच या कारखान्याने आपले परिचालन बंद केले आहे. उस शेतकर्‍यांनी आपल्या पैशांसाठी ऑक्टोबर मध्ये संसदीय उद्योग, वाणिज्य, श्रम आणि ग्राहक कल्याण समितीकडेही मागणी केली होती. पण तेदेखील त्यांची समस्या सोडवू शकलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here