नेपाळ: श्रीराम साखर कारखाना एक महिन्यात ऊस बिले देणार

काठमांडू, नेपाळ : श्रीराम साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एक महिन्यात उसाचे पैसे देण्याची तयारी दर्शवीली आहे. २१ मार्च रोजी कारखान्यात शेतकरी प्रतिनिधी आणि कारखान्यादरम्यान रौतहटचे सीडीओ इंद्रदेव अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या थकीत रक्कम देण्याबाबतचा निर्णय झाला.

या निर्णयानुसार, कारखाना शेतकऱ्यांना एक महिन्यात ऊसाचा योग्य दर देईल. कारखाना दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नव्हते. कारखाना बंद झाल्याने शेतकऱ्यांचे ४०० मिलियन रुपये थकीत होते. यापैकी व३७० मिलियन रुपये विविध टप्प्यांवर देण्यात आले. सध्या कारखाना शेतकऱ्यांचे ३० मिलियन रुपये देणे आहे.

कारखान्याने एक महिन्यात शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती सीडीओ इंद्रदेव यादव यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here