नेपाळ : साखर कारखान्यांना भेडसावतेय ऊस टंचाईची समस्या

रौतहट : रौतहट व सरलाही जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे पाठ फिरवल्याने या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. रौतहट येथील बाबा बैजुनाथ शुगर अँड केमिकल इंडस्ट्रीचे संचालक म्हणाले की, मुख्य हंगामात उसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. इंदू शंकर साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक योग नारायण रजक यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून कारखान्याला आवश्यक प्रमाणात ऊस मिळालेला नाही. उसाच्या उपलब्धतेवर कारखाना चालू – बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरलाही येथील अन्नपूर्णा साखर कारखानाही उसाच्या उपलब्धतेनुसार चालवला जात आहे. कारखान्याचे संचालक शैलेंद्र गुप्ता म्हणाले की, उसाचा तुटवडा असल्याने कारखाना चालविण्यात अडचण येत आहेत. शेतकऱ्यांनी ऊस दिल्यानंतरच कारखाना चालवण्याचे धोरण बाबा बैजुनाथ, इंदू शंकर आणि अन्नपूर्णा साखर कारखान्यांनी अवलंबले आहे. मात्र, रौतहाट व सरलाही येथील तीन कारखाने अद्याप सुरू आहेत. सरलाही येथील महालक्ष्मी साखर कारखाना बंद झाला आहे. कारखान्याचे ऊस व्यवस्थापक पवनसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी कारखान्याने 12 लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here