महाराष्ट्रात एक ऑक्टोबरपासून नविन गळीत हंगाम सुरू होणार : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

पुणे : राज्याचा पुढील वर्षासाठीचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले. २०२२-२३ या ऊस गळीत हंगामाच्य़ा नियोजनाचे काम सुरू आहे.

सहकारी मंत्री पाटील यांनी गुरुवारी राज्यातील २०२१-२२ या हंगामाचाही आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, गळीत हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण, तोडणी मजुरांच्या टंचाईमुळे ऊसाच्या तोडणीत अडचणी येऊ नयेत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस शेतीची नोंद योग्यरित्या केलेली नाही. त्यामुळे राज्यात ऊसाच्या क्षेत्राचे योग्य अनुमान लावले जाऊ शकत नाही. त्यामुळे मराठवाड्यात अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here