नांदेड विभागातील नऊ कारखाने बंद

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, २८ मार्चअखेर ६८ साखर कारखाने बंद झाले आहेत.

नांदेड विभागात एकूण २५ कारखाने आहेत. त्यापैकी नऊ साखर कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागात ८९.५८ लाख टन ऊस गाळप करून ८९.३१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. येथील साखरेचा उतारा ९.९७ टक्के आहे.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २८ मार्च २०२१ अखेर राज्यात १८८ साखर कारखान्यानी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९५४.९१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९९७.१२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४४ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ३३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात १७ कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागात ३ कारखाने बंद झाले आहेत. तर अहमदनगर, औरंगाबाद आणि अमरावती विभागात प्रत्येकी २ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here