ऊस उपलब्ध नसल्याने मलकपूर, रमाला कारखान्यात नो केन स्थिती

बागपत : मलकपूर साखर कारखाना आणि रमाला सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा होऊ न शकल्याने ‘नो केन’ स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही साखर कारखान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. रमाला कारखान्याच्या यार्डमध्ये तर पाणी साठले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठले आहे. मलकपूर साखर कारखान्यात गुरुवारी फक्त ३०-४० हजार क्विंटल ऊस आला. शुक्रवारी ऊसच न आल्याने कारखान्यात नो केन स्थिती होती.

कारखान्याचे युनीट प्रमुख विपिन चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत कारखान्याकडे ऊस खूप कमी प्रमाणात येत आहे. शुक्रवारी ऊसाअभावी नो केन स्थिती निर्माण झाली. अद्याप तीन ते चार लाख क्विंटल ऊस येणे अपेक्षित आहे.
रमाला सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर. बी. राम यांनी सांगितले की, कार्यक्षेत्रातील ऊस खरेदी बंद करण्यात आली आहे. फक्त साखर कारखान्याच्या गेटवरच ऊस स्वीकारला जात आहे. पावसामुळे तोडणी न झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून कारखाना संथगतीने सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ऊस न आल्याने नो केन स्थिती निर्माण झाली.

कारखान्याने गळीत हंगामातील पूर्ण इंडेंट जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिल्लक राहिलेला सर्व ऊस कारखान्याकडे पाठवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here