जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना डीसीओ नी पाठवली नोटीस

बिजनौर : ठरल्याप्रमाणे शेतकर्‍यांना ऊस थकबाकी न भागवल्याने डीएम रमाकांत पांडे यांच्या निर्देशावर डीसीओ यशपाल सिंह यांनी बिजनौर, चांदपुर, बिलाई साखर कारखाना, धामपुर साखर कारखाना आणि बुंदकी साखर कारखान्याला नोटीस पाठवली आहे. शेतकर्‍यांना थकबाकी न दिल्याने साखर कारखान्या विरोधात कारवाई होईल.

डीएम रमाकांत पांडे यांनी सोमवारी संध्याकाळी ऊस थकबाकी बाबत साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांची समिक्षा बैठक घेतली. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांना सांगितले की, थकबाकी भागवण्यात विलंब केल्यास डीएम यांच्या निर्देशावर बिजनौर, चांदपुर, बिलाई, धामपुर आणि बुंदकी साखर कारखान्याला नोटीस पाठवली आहे.

डीसीओ यांनी सांगितले की, समीक्षा बैठक़ीदरम्यान, धामपुर साखर कारखान्याने 20 करोड च्या बदल्यात शून्य पैसे भागवले आहेत. स्योहारा कारखान्याने 15 करोड च्या बदल्यात 7 करोड 29 लाख, बिलाईने 20 करोडच्या बदल्यात 7 करोड 21 लाख, बहादरपुर कारखान्याने पाच करोड च्या बदल्यात 5 करोड 63 लाख, बरकातपूर साखर कारखान्याने 15 करोड, बुंदकी ने 10 करोडच्या बदल्यात 6 करोड 16 लाख, बिजनौर आणि चांदपुर साखर कारखान्याने 5 करोड च्या बदल्यात शून्य आणि नजीबाबाद साखर कारखान्याने 2 करोड च्या बदल्यात शून्य थकबाकी भागवली आहे.
डीसीओ यांनी सांगितले की, डीएम यांनी साखर कारखान्यांना या आठवड्यात थकबाकी भागवण्याचे लक्ष्य दिले आहे. 25 धामपुर साखर कारखाना, स्योहारा साखर कारखाना,बिलाई आणि बरकातपूर साखर कारखान्याना 15-15 करोड आणि इतर साखर कारखान्यांना 5-5 करोड चे लक्ष्य दिले आहे. गेंल्या आठवड्यात 97 करोडच्या बदल्यात 41 करोड 31 लाखाची थकबाकी भागवली आहे. डीसीओ यशपाल सिंह यांनी सांगितले की, सर्व साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here