ऊस थकबाकी भागवण्यासाठी साखर काखान्यांना नोटीस

बागपत : साखर कारखान्यांकडून 500 करोड रुपये ऊस थकबाकी देय आहे , ज्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी आता साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना नोटीस जारी केली आहे. ऊस थकबाकी न भागवल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सहकारी साखर कारखाना बागपत कडून 44.97 करोड रुपये, रमाला कडून 87 करोड रुपये आणि मलकपूर साखर कारखान्याकडून सर्वाधिक म्हणजे 369 करोड रुपये देय बाकी आहे. जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी तीनही कारखाना व्यवस्थापकांना तात्काळ ऊस थकबाकी देण्याबाबत सांगितले आहे. कोरोना काळात बागपत मध्ये हजारो शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. बहुतांश शेतकर्‍यांना घरखर्च चालवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. सरुरपूर कला येथील शेतकरी सुभाष जैन, निनाना येथील इंद्रपाल यांनी सांगितले की, ऊस थकबाकी न मिळाल्यामुळे शेतकरी आपल्या मुलांची लग्नेही करु शकत नाहीत. भाकियू जिल्हाध्यक्ष चौ. प्रताप सिंह गुर्जर यांनी सरकारकडून साखर कारखान्यांनी लवकरात लवकर ऊसाचे पैसे भागवावेत अशी मागणी केली आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here