साखर कारखान्यामध्ये शेतकर्‍यांना अडचण आल्यास अधिकार्‍यांची खैर नाही: सुरेश राणा

रमाला: ऊस मंत्री सुरेश राणा यांनी रमाला सहकारी साखर कारखान्याला अचानक भेट देवून त्याची पाहणी केली. दिल्ली सहारनपूर हायवे पासून साखर कारखान्यात येणार्‍या रस्त्यांवर प्रकाशाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. कोहरे मध्ये दुर्घटनेपासून वाचण्यासाठी रिफ्लेक्टर लावण्यासाठी शेतकर्‍यांना प्रेरीत केले. त्यांनी सांगितले की, कृषी कायद्यांनी शेतकर्‍याचे भले होईल.

शेतकर्‍यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण प्राथमिकतेने करण्याचे आदेश कारखाना अधिक़ार्‍याना दिले. रविवारी रात्री जवळपास आठ वाजता उस मंत्री सहकारी साखर कारखान्यात आले. त्यांनी यार्डमध्ये अलावाच्या व्यवस्थेबाबत निर्देश दिले. रात्री येणार्‍या शेतकर्‍यांसाठी थंडीपासून बचाव व्हावा यासाठी व्यवस्था करण्यात यावी. कारखाना अधिक़ार्‍यांना सांगितले की, कोहरे मध्ये दुर्घटना रोखण्यासाठी पुरेशा प्रकाशाची गरज आहे. शेतकर्‍यांच्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावावेत आणि शेतकर्‍यांनाही प्रेरीत करावे. पेयजल व्यवस्था करण्याचेही निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, रमाला कारखान्यामध्ये व्यवस्था चांगल्या मिळाल्या आहेत. शेतकर्‍यांनीही गाळप क्षमता वाढणे आणि हंगाम नियमित झाल्याने आनंद व्यक्त केला. कारखाना अधिक़ार्‍यांनी ऊस मंत्री यांना सांगितले की, साखर कारखान्याने आतापर्यंत 28 लाख क्विंटल उस गाळप केले आहे. शेतकर्‍यांनी ऊस मंत्री यांच्याकडे मागणी केली की, कैलेंडर मध्ये संशोधन 12 व्या आठवड्यापूर्वी व्हावे, यामुळे शेतकर्‍यांना लाभ होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here