चार कारखान्यांनी भागवली शंभर टक्के थकबाकी, एका कारखान्याकडून पैसे देय

कुशीनगर, उत्तर प्रदेश: इथे पाच साखर कारखान्यांमध्ये चार कारखान्यांनी शेतकर्‍यांची थकबाकी भागवली आहे. ढाढा, सेवरही, खड्डा आणि रामकोला यांनी शंभर टक्के पैसे भागवले आहेत. आता केवळ कप्तानगंज साखर कारखान्यांवर 32 करोड रुपये देय आहेत.

उस विभागाने एक आठवड्याची मुदत दिली आहे. तसेच असा इशाराही दिला आहे की, थकबाकी न भागवल्यास कारखाना व्यवस्थापना विरोधात कारवाई होईल. कुशीनगर मध्ये ए़कूण 103140.75 लाख रुपये मूल्याच्या उसाचे गाळप झाले, ज्याच्या सापेक्ष आतापर्यंत 99372.68 लाख रुपये इतकेच पैसे भागवले आहेत. कप्तानगंज साखर कारखान्याकडून आतापर्यंत पैसे न भागवल्यामुळे रोख पीकावर अश्रित शेतकरी थकबाकीमुळे अडचणीत आहेत. यामुळे त्यांच्या नित्यांच्या गरजांवर परीणाम होत आहे. गेल्या वर्षी 2019-20 मध्ये कारखान्यांनी 320.34 लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते, ज्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच कारखान्यांनी भागवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here