महाराष्ट्रात फक्त ४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

पुणे: महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात १६ मे २०२१ अखेर १८६ साखर कारखाने बंद झाले असून अद्याप फक्त ४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १६ मे २०२१ अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १०१२.०० लाख टन उसाचे गाळप करून १०६२.११ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.५० टक्के आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. नांदेड विभागातील २६ कारखाने बंद झाले असून पुणे विभागातील ३१ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अहमदनगर विभागातील २५ कारखाने बंद झाले असून औरंगाबाद विभागातील १९ आणि अमरावती विभागातील २ कारखानेही बंद झाले आहेत. नागपूर विभागातील ३ साखर कारखानेही बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here