साखर कारखान्यांना जास्तीत जास्त ऊसतोडणी मशिनचा वापर करण्याचे आदेश

कोल्हापूर : कोरोना महामारीचा पुढच्या साखर हंगामावरील परिणाम दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांना ऊस तोडीसाठी जास्तीत जास्त हार्वेस्टर मशीन्सचा वापर करण्याबाबत सांगितले आहे. जेणेकरुन इतर भागातून येणार्‍या ऊस तोड मजुरांची संख्या कमीत कमी ठेवली जावू शकेल.

जिल्हाधिकारी देसाई यानीं सांगितले की, ऊसतोडीसाठी दिशानिर्देश तयार केंले आहेत, ज्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात काही मर्यादेपर्यंत मदत होवू शकेल.

साखर हंगामादरम्यान मराठवाडा परिसरातून श्रमिक पश्‍चिम महाराष्ट्रात येतात आणि पुढील तीन ते चार महिन्यापर्यंत राहतात. मजूर इथे आपल्या कुटुंबाबरोबर येतात आणि अस्थायी तंबूमध्ये राहतात.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कोणत्याही ऊस श्रमिकाला काम करण्याची परवानगी देवू नये. त्यांनी सांगितले की, कारखान्यांनी हे निश्‍चित केले पाहिजे की, ऊस श्रमिकाची पहिल्यांदा कोविडची टेस्ट करावी आणि पुन्हा काही दिवसांसाठी त्यांना क्वारंटाइन मध्ये ठेवले जावे. श्रमिकांची संख्या कमी राहण्यासाठी कारखान्यांना जास्तीत जास्त हार्वेस्टर मशीन्सची खरेदी करणे आवश्यक आहे.

त्यांनी कारखान्यांना मजुरांचे परीक्षण आणि नियमित आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कारखान्यांना त्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी सॅनिटायजर, हॅन्ड ग्लोव्हज आणि प्रत्येक दिवस एक नवा मास्क दिला जावा.

जेव्हा मार्चमध्ये लॉकडाउन लागू केला होता, तेव्हा कोल्हापूर मद्ये हजारो ऊसतोड मजूर अडकले होते. त्यांना बसमधून त्यांच्या गावामध्ये घेवून जाण्यात आले होते आणि आपल्या घरी पोचल्यानंतर कोविड 19 ची तपासणी करण्यात आले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here