ऑनलाइन घोषणापत्र न भरलेले एक लाखावर शेतकरी अडचणीत

बिजनौर : जिल्ह्यातील जवळपास एक लाखावर शेतकऱ्यांची बेफिकीरी त्यांना अडचणीत आणू शकते. चालू गळीत हंगामात ऑनलाइन घोषणापत्र न भरल्याने एक लाख शेतकऱ्यांचा उसाचा सट्टा बंद होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी आताही घोषणापत्र न भरल्यास त्यांचे ऊस व्यवस्थापन बंद पडू शकते. जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांची नोंदणी ऊस विभागाकडे आहे. मात्र, ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरही एक लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन घोषणापत्र भरलेले नाही. ऊस सर्व्हेसोबतच ऑनलाइन घोषणापत्र भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांनी शंभर टक्के घोषणापत्र भरलेले नाही.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदाच्या हंगामातही सर्व शेतकऱ्यांना घोषणापत्र भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा सट्टा बंद होण्याचे संकट आहे. त्यांचा सट्टा खंडीत होईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभही मिळणार नाहीत. ऑनलाइन घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे लागवड क्षेत्र, जमिनीचे क्षेत्रफळ, आधार कार्ड नंबर आदींचे विवरण देणे अपेक्षित आहे. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऊस आयुक्तांच्या निर्देशानुसार घोषणा पत्र भरण्यासाठी मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here