नंगलामल कारखान्याकडून शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले अदा

किठौर : नंगलामल साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील उसाचे सर्व पैसे शेतकऱ्यांना अदा केले आहेत. कारखान्याच्या पाहणीसाठी आलेल्या जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना युनिटच्या प्रमुखांनी समितीला पाठविलेल्या अॅडव्हायजरीची प्रतही सादर केली.

नंगलामल साखर कारखान्याचे युनिट हेड वाय. डी. शर्मा यांनी सांगितले की, गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने १०५.५३ लाख क्विंटल उसाची खरेदी केली होती. त्याची एकूण किंमत ३३७८५.३२ लाख रुपये होती. कारखाना प्रशासनाने ऊस समितीला सर्व पैसे पाठविण्यासह आंशिक पैसेही परिषदेकडे जमा केले आहेत. वाय. डी. शर्मा यांनी सांगितले की, अॅडव्हायजरी समितीला याची एक प्रत पाठविण्यासह जिल्हा ऊस अधिकारी दुष्यंत कुमार यांनाही ही प्रत सादर करण्यात आली आहे. दुष्यंत कुमार हे कारखान्याच्या दौऱ्यावर आले होते. तर ऊस विभागाचे अध्यक्ष एल. डी. शर्मा यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगामासाठी ऊसाच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून याची पडताळणी करावी आणि ऑनलाईन घोषणापत्र भरावे. त्यामुळे त्यांना ऊस गाळपावेळी अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. उसाच्या ०२३८ या प्रजातीवर रोगांचा फैलाव अधिक होत असल्याचे वजन खूप कमी येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. कारखान्याने यासाठी शेतकऱ्यांना ०११८, १५०२३ आणि ८२७२ या प्रजाती लागवडीसाठी उपलब्ध करून दिल्या असल्याचे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here