मुझफ्फरनगर : त्रिवेणी शुगर मिलचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी सांगितले की साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाची बिले अदा केली आहेत.
सोमवारी याबाबत माहिती देताना डॉ. अशोक कुमार म्हणाले, की, साखर कारखान्याने १७ डिसेंबक २०२१ अखेरपर्यंतची २९.५२ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात बिले देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ताजा आणि साफ ऊस पाठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. आधी तोडणी केलेला तसेच साफ न केलेला ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.