ऊस शेतकर्‍यांची थकबाकी तात्काळ भागवा: प्रियांका गांधी

लखनऊ: काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी योगी सरकारला सांगितले की, ऊस शेतकर्‍यांची थकबाकी तात्काळ भागवा. त्यांनी गरीब, शेतकरी आणि मध्यम वर्गाला दिलासा मिळावा यासाठी उपाय सांगितले, जे कोरोंना संकटामुळे अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले की, कोरोना महामारीचा सामान्य जीवनावर परिणाम झाला आहे. ऊस थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शेतकरी, गरीब लोक आणि मजुर वाईट अवस्थेत आहेत. आर्थिक संकटामुळे मध्यम वर्ग आणि सामान्य श्रमिक लोक यांच्यावरही परिणाम झाला आहे. तर व्यावसायिक आणि व्यापारी वर्ग आता आपले अस्तित्व वाचवण्यासाठी संकटाचा सामना करत आहेत. आता या वर्गांना मदत करणे आवश्यक झाले आहे. चार महिन्यात शेतकर्‍यांचे वीज आणि ट्यूबवेल बिल माफ केले जावे, तर त्यांच्या उर्वरीत वीज बिलांवरचा दंड आणि त्यावरील व्याजही माफ केले जावे. शेतकर्‍यांच्या कर्जावर चार महिने व्याज माफ केले जावे आणि शेतकर्‍यांना त्यांचे संपूर्ण पिक विक्रीसाठी मदत केली जावी. ऊसासहित सर्व थकबाकी भागवली जावी.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here