दौराला साखर कारखान्याकडून २८ एप्रिलपर्यंतचे बिल अदा

दौराला : साखर कारखान्याने मंगळवारी गळीत हंगाम २०२०-२१ मधील २८ एप्रिलपर्यंतचे ऊस बिले अदा केली आहेत. साखर कारखान्याने संबंधित ऊस समित्यांना याबाबतचे अ‍ॅडव्हाईस पाठविले आहेत.

साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक संजीव कुमार खाटियान यांनी सांगितले की,२५ एप्रिलपासून २८ एप्रिलअखेरची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. याबाबत संबंधीत समित्यांकडे अ‍ॅडव्हाईस पाठविण्यात आल्या आहेत असे खाटियान यांनी सांगितले. सचिव दौराला यांनी सांगितले की, अ‍ॅडव्हाईस मिळाले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले जातील. साखर कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना ६५८.३४ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here