साखर कारखान्याकडून तीन डिसेंबरपर्यंतची ऊस बिले अदा

मुजफ्फरनगर : खतौली येथील त्रिवेणी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्यांचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात कारखान्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

उपाध्यक्ष डॉ. कुमार यांनी सांगितले की, साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन डिसेंबर २०२१ अखेर खरेदी केलेल्या ऊसापोटी ४५.१५ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. साखर कारखाना आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात अव्वल क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर तोडणीचा मेसेज आल्यानंतरच ऊस घेऊन कारखान्याला यावे असे आवाहन उपाध्यक्षांनी केले आहे. आधी तोडणी केलेला ऊस कारखान्याकडून स्वीकारला जाणार नाही. शेतकऱ्यांनी ताजा ऊस आणल्यास कारखान्याला आणि शेतकऱ्यांनाही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here