साखर कारखाना जिवंत राहण्यासाठी सरकारने योजना करावी: ऊस शेतकर्‍यांची मागणी

पणजी : संजीवनी साखर कारखान्याचे अस्तित्व राहण्यासाठी सरकारने योजना तयार करावी अशी मागणी ऊस शेतकर्‍यांनी केली आहे. सुंगेम येथील ऊस शेतकर्‍यांनी दावा केला की, कारखान्यावर केवळ ऊस शेतकरीच अवलंबून नाहीत, तर ट्रॅक्टर आणि ट्रक मालक, मजूर, ड्रायव्हर यांसारखे हजारो लोक अवलंबून आहेत. वादेम सुंगेम मध्ये आयोजित बैठक़ीत शेतकर्‍यांनी सरकारला कारखान्याच्या मुद्द्यावरुन हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी काम करण्याबाबत सांगितले.

वर्षानुवर्षे करोडोंचे नुकसान झाल्याने कारखाना बंद होणार असल्याची चर्चा होत आहे, पण शेतकर्‍यांनी राज्य सरकारला कारखाना चालू ठेवण्यासाठी आग्रह केला आहे. बैठक़ीत सांगण्यात आले होते की, सरकारने कारखाना बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानंतर, सरकारने प्रशासकांशी बोलताना सांगितले होते की, कारखाना बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई यांनीही दावा केला की, एकीकडे सरकार शेतकर्‍यांकडून ऊस शेती दुप्पट करण्याचा आग्रह करत आहे, आणि दुसरीकडे कारखाना बंद करण्याबाबत विचार करत आहे. ते म्हणाले, आजपर्यंत शेतकर्‍यांनी सातत्याने सरकारच्या चुकीची शिक्षा भेागली आहे. गेल्या हंगामात सरकारकडून कारखान्याला पुरवण्यात आलेल्या ऊसाचे पैसे देण्यात कारखाना विफल ठरलेला आहेत, ज्यामुळे शेतकर्‍यांना खूप मोंठे नुकसान सोसावे लागले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here