इंडोनेशियात भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दु:ख

इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मनोकामना व्यक्त करत, या दु:खाच्या काळात इंडोनेशियाच्या पाठीशी भारत ठामपणे उभा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान ट्वीट संदेशात म्हणाले;

“इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या मालमत्ता आणि जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियां प्रति मनापासून सहवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही सदिच्छा. या दु:खाच्या काळात भारत इंडोनेशियासोबत उभा आहे.”

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here