उत्तरप्रदेश मध्ये येणाऱ्या गाळप हंगामाची तयारी सुरू

बिजनौर: जिल्हयात सातत्याने वाढणारे ऊसाचे क्षेत्रफळ आणि उत्पादन पाहून यंदा कारखाने सावध झाले आहेत. कारखाना बंद झाल्यानंतर लगेचच कारखान्यांनी पुढच्या गाळप हंगामाची तयारी सुरु केली आहे. कारखान्यात दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. ऊस सर्वेचे कार्य ही शेतामध्ये केले जात आहे. गेल्या वर्षीचा गाळप हंगाम लांबल्यामुळे कारखाने आणि शेतकरी दोघांनाही अडचणींना सामोरे जावे लागले होते.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु केले होते. कारखान्यांनी ऊस पाहून लवकर गाळप सुरु केले होते पण शेतामध्ये आलेल्या बंपर पीकाच्या समोर कारखान्यांच्या तयारीने हात टेकले. साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांची मोठी रांग लागली होती. शेतकऱ्यांकडे ऊस पावती ही कमी पडली होती. गाळप हंगाम जून पर्यंत चालला. शेतकऱ्यांची आपापसातच साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपासाठी मारामारी सुरु होती. कारखान्यांमध्ये गेल्या हंगामातील मारामारी पाहून कारखान्यांनी गाळप हंगाम संपताच लगेचच पुढच्या गाळप हंगामाची तयारी सुरु केली आहे. सर्व कारखान्यांनी आपल्या मशीनच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. पुढचा गाळप हंगाम गेल्या वर्षापेक्षाही आधी सुरु करण्याची तयारी सुरु केली जात आहे.

बिजनौर साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक राहुल चौधरी म्हणाले, यावेळी ऊस क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता आहे. हे पाहता आगामी गाळप हंगामात साखर कारखाना लवकर सुरु करण्याची तयारी केली जात आहे. कारखान्यात दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here