बाजपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची तयारी पूर्ण

बाजपूर: साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाबाबत कारखान्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातून येणारे कारखान्याचे कंत्राटी कर्मचार्‍यांची आता कोविड टेस्टच्या निगेटीव रिपोर्ट पाहिल्यानंतरच कारखान्यामध्ये प्रवेश दिला जाईल.

मंगळवारी साखर कारखान्याचें प्रधान व्यवस्थापक प्रकाश चंद यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाबाबत कारखान्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 20 नोव्हेंबरला कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. जीएम यांनी सांगितले की, कोविड 19 संक्रमणादरम्यान कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करणे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. त्यांनी सांगितले की, या अव्हानाला झेलण्यासाठी कारखान्याने विशेष तयारी केली आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्यामध्ये प्रवेेश घेण्यापूर्वी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकार्‍याला थर्मल स्कैनिंग प्रक्रियेतून जावे लागेल तसेच आपल्या हातांना सॅनिटाइज केल्यानंतरच आत प्रवेश दिला जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here