युपीमध्ये आधीच्या सरकारने साखर कारखाने विकले, सीएम योगींनी कारखाने वाचवले: राज्यमंत्री

बिजनौर : आधीच्या सरकारने साखर कारखानदारी विकली होती, आम्ही साखर कारखानदारी वाचवून ऊस उत्पादन वाढवले आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे ऊस विकास राज्यमंत्री संजय गंगवार यांनी बिजनौर येथे केले. नजीबाबाद साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू केले जाईल, असा दावाही त्यांनी केला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विकास राज्यमंत्री संजय गंगवार म्हणाले की, राज्य सरकारने साखर कारखानदारी वाचवणे, उसाचे उत्पादन वाढवणे यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्याचे काम केले आहे.

साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक सुखबीर सिंग आणि सीसीओ डॉ. एस. एस. ढाका यांच्या उपस्थितीत मंत्री प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आधीच्या सरकारने १९ साखर कारखान्यांची विक्री केली होती. योगी सरकारने साखर कारखानदारी वाचवण्यासह उसाचे क्षेत्र वाढवणे, साखर उत्पादन वाढवणे या दिशेने विशेष काम केले. नजीबाबाद साखर कारखान्याच्या विस्तारीकरण योजनेचे कामही वेगाने सुरू आहे, असे संजय गंगवार म्हणाले. दरम्यान, शेतकरी सहकारी साखर कारखाना व अश्वनी कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष धर्मपालसिंग चौहान, प्रांत सरचिटणीस सत्येंद्र गौतम यांनी मंत्र्यांना चार मागण्यांचे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here