उत्तर प्रदेशातील खाजगी साखर कारखाने आर्थिक संकटात

लखनऊ: उत्तर प्रदेशामध्ये ऊस थकबाकी अजूनही प्रलंबति आहे आणि साखर कारखाने अर्थिक संकटामुळे थकबाकी भागवण्यात अपयशी आहेत. साखर निर्यात, अतिरिक्त साखर साठा अनुदान आणि यूपी पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल) यांना विकण्यात आलेल्या विजेचे जवळपास 3,500 करोड रुपये भागवणे अजूनही बाकी आहे ज्यामुळे खाजगी साखर कारखाने आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यूपी शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्यांनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हे देय बाकी आहे. सध्या, राज्यामध्ये 119 कार्यात्मक साखर कारखाने आहेत, ज्यापैकी 92 खाजगी, 24 सहकारी आणि तीन कारखाने राज्य सरकारच्या स्वामित्व वाले आहेत.

यूयीएसएमए चे महासचिव दीपक गुप्तारा यांनी सांगितले की, आम्ही नियमीतपणे केंद्र आणि राज्य सरकारकडून थकबाकी भागवण्यात गती आणण्याचा आग्रह करत आहोत, पण आता पर्यंत काही झाले नाही. बंदरापासून राज्य दूर अंतरावर असूनही यूपीतील साखर कारखान्यानीं केंद्राच्या निर्यात उद्द्ेश पुर्ण करण्यासाठी योगदान दिले.

यूपी ऊस आणि साखर उद्योग प्रमुख संजय आर भूसरेड्डी म्हणाले, सरकार याबाबत सर्वात चांगले पाऊल उचलत आहे तसेच ऊस शेतकरी आणि कारखानदार यांच्या हितरक्षणासाठी कटीबद्ध आहे. ते म्हणाले, कोरोना वायरस च्या प्रकोपामुळे यावर्षी देशामध्ये आर्थिक गतिरोध निर्माण झाला, पण कारखान्यांच्या थकबाकीचा मुद्दा लवकरच निपटवण्यात येईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here