ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रियंका गांधी करणार किसान पंचायत

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी – वाड्रा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यांच्या थकबाकीच्या मागणीसाठी किसान पंचायतचे आयोजन करणार आहेत.

काँग्रेसकडून अशा बैठकांचे सत्र आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये प्रियंका गांधी साखर कारखानदारांकडून थकबाकी न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित करतील. प्रियंका यांनी नुकतेच मथुरा येथे एका किसान पंयाचतमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात जनजागृती करण्यात आली. काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील २७ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे जनजागृती अभियान सुरू केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० या गळीत हंगामातील उसाची थकबाकी मिळालेली नाही. २०२०-२१ या हंगामात एसएपी गेल्यावर्षीप्रमाणे ३१५ रुपये प्रतिक्विंटल ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. उसाचा प्रजातीनुसार दर ३२५ रुपये आणि ३१५ रुपये प्रति क्विंटल असाच राहील.

सलग तिसऱ्या वर्षी राज्य सरकारने उसाच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ सरकार सत्तेवर आल्यानंतर एसएपीमध्ये १० रुपयांची वाढ करण्यात आली होती. सध्याच्या ३२५ रुपये एसएपीमध्ये वाढ करून ती ४५० रुपये प्रतिक्विंटल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here