करीमनगर : कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO) तेलंगणाने तांदळाचे कोठार मानल्या जाणाऱ्या करीमनगर जिल्ह्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. कृषक भारती KRIBHCO चे अध्यक्ष चंद्रपाल सिंह, व्यवस्थापकीय संचालक राजन चौधरी, कार्यकारी संचालक वी. एस. आर. प्रसाद यांनी तेलंगणा राज्य योजना बोर्डाचे (टीएसपीबी) उपाध्यक्ष बी. विनोद कुमार, उद्योग आणि आयटी मंत्री के. टी. रामा राव आणि करीमनगर जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेसोबत (डीसीसीबी) चर्चा केली. डीसीसीबीचे अध्यक्ष कोंडुरु रविंद्र राव यांनी रविवारी हैदराबादमध्ये
एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, KRIBHCO ने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा प्रस्ताव आणला आहे. शेतकऱ्यांनी राज्यात उच्चांकी भात, मक्का उत्पादन केले आहे.
प्रस्तावाबाबत प्रतिक्रीया देताना टीएसपीबीचे विनोद कुमार यांनी कृषक भारतीला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रस्तावित इथेनॉल सयंत्रासाठी योग्य ठिकाणाची निवड करण्यासाठी कृषक भारतीची टीम करीमनगर जिल्ह्याचा दौरा करण्याची शक्यता आहे.