साखर कारखाना बंद न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रस्तावित संप रद्द

पोंडा, गोवा: गोवा सरकारकडून संजीवनी साखर कारखाना बंद न करण्याच्या अश्‍वासनाने संतुष्ट झालेल्या ऊस शेतकर्‍यांनी आपला मंगळवारी होणारा प्रस्तावित संप रद्द केला. अनेक अडचणींदरम्यान, गोवा सरकारने गेल्या मंगळवारी घोषणा केली होती की, संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही आणि कारखान्याला सहकार विभागाकडून कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले . साखर कारखान्याच्या भविष्याबाबत सरकारच्या विलंबामुळे निराश होवून ऊस उत्पादकांनी जर सरकार 25 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेण्यात अपयशी ठरले , तर 29 सप्टेंबर पासून कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण कारखान्याबाबत राज्य सरकारने आपली दिशा स्पष्ट केल्यानंतर शेतकर्‍यांनी संप रद्द करण्याचा निर्णय घेतला.

गोवा ऊस उत्पादक संघाचे उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या अश्‍वासनाने आम्ही आनंदी आहोत की, ऊस शेतकर्‍यांच्या उभ्या पीकाची भरपाई तोपर्यंत दिली जाईल जोपर्यंत कारखाना सुरु होत नाही. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी नंतर लगेचच कारखान्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. यावर्षी कारखान्याची देखभाल आणि दुरुस्ती सुरु केली नव्हती, शेतकरी संभ्रमावस्थेत होते की,कारखाना आगामी गाळप हंगामा दरम्यान सुरु होईल की नाही.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here