पगार न मिळाल्याने संतप्त साखर कारखाना कामगारांची निदर्शने

सुलतानपूर : किसान सहकारी साखर कारखान्यात कार्यरत शेकडो कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. जर तीन दिवसांत थकीत वेतन दिले नाही तर कारखान्यात चक्का जाम करण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला.

सैदपूर येथील एकमेव किसान सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांचा गेल्या ३३ दिवसांपासून वेतन, भत्ते आदी बाबी दिलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात आहेत. पैसे नसल्याने अनेकांना वैद्यकीय उपचारातही अडचणी आल्या आहेत. याबाबत १७ डिसेंबर रोजी साखर कारखाना व्यवस्थापक आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. दोन जानेवारीपर्यंत आंदोलन सुरूच राहील. त्यानंतर सोमवारपासून चक्का जाम करण्याचा इशारा कामगारांनी दिला. दरम्यान, यामुळे कारखान्याच्या कामकाजात अडथळे आले आहेत. यावेळी अवधेश सिंह, लल्लन सिंह, काली प्रसाद आदींसह शेकडो कर्मचारी उपस्थित होते. याबाबत कारखान्याचे सरव्यवस्थापक आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक प्रताप नारायण यांनी सांगितले. कामगारांना काही प्रमाणात वेतन दिले जाणार आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here