मुंबई : महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशांना ठोस मदत केली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाडा आणि इतर क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना सांगितले की, राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या लोकांना त्वरीत मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. लोकांना आता पोकळ आश्वासने नको आहेत.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, आताच्या पावसामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने त्यांना मदत करण्याच्या प्रक्रियेत गतिमानता आणली पाहिजे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link