पंजाब: ३२ लाख क्विंटलच्या उद्दिष्टपूर्तीनंतर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्तीच्या वाटेवर

नवाशहर : साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामात ३२ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्यात नो केनसारखी स्थिती वारंवार उद्भवत आहे. अंतिम टप्प्यात जसजसा ऊस येईल, तसे गाळप केले जात आहे. आता ऊस उपलब्ध नसल्याने कारखान्याकडून गळीत हंगाम समाप्तीची घोषणा आज केली जाऊ शकते.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना प्रशासनाने सांगितले की, २० मार्चअखेर ऊसाची बिले देण्यात आली आहेत. एकदा कारखाना बंद झाला की, एकूण साखर उत्पादन, खर्च याचा ताळमेळ घातला जाईल. २३ नोव्हेंबर रोजी कारखान्याने गाळपास सुरूवात केली होती. यंदा १४१ दिवस गाळप झाले आहे. या कालावधीत अनेकवेळा काही ना काही कारणांनी गाळप बंद ठेवावे लागले आहे. त्यामुळे मार्चमध्ये संपुष्टात येणारा हंगाम आणखी पंधरा दिवस लांबला. कारखान्याने २ कोटी रुपये खर्च करून नवीन वॅट स्क्रबर बसवला आहे. लवकरच तो प्लांटशी जोडला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात अडचणी येणार नाहीत, असे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here