नोकरी: साखर कारखान्यातील २३ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती पत्रे

चंडीगड : सहकारी साखर कारखान्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना गुणवत्तेच्या आधारावर नोकरी देण्याच्या प्रलंबित विषयाबाबत त्वरीत कार्यवाही करताना शुगरफेडने बुधेवाल सहकारी साखर कारखान्यातील २३ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना घर घर रोजगार योजनेअंतर्गत, नियुक्ती पत्रे दिली आहेत. पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये पूर्व बटाचा सहकारी साखर कारखान्यातील मृत १३ आणि अजनाला सहकारी साखर कारखान्याच्या ८ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचाही समावेश आहे.

मंत्री रंधावा म्हणाले, सहकारी साखर कारखाने अशा प्रकरणांमध्ये गतीने कार्यवाही करत आहेत. कारण कर्मचारी हाच संस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कल्याणाचा विचार करणे हे विभागाचे काम आहे. विभागाने शासन निर्देशानुसार अशा प्रकरणांमध्ये अनुकंपा तत्वाच्या आधारे रोजगार देण्यास सांगितले आहे. यावेळी शुगरफेडचे अध्यक्ष अमरिक सिंह अलीवाल यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे. मंत्री तसेच शुगरफेडचे आभार मानत खन्नाचे आमदार गुरकिरत सिंह कोटली यांनी सांगितले की, या नियुक्त्यांची प्रकरणे गेल्या १५-२० वर्षांपासून प्रलंबित होती. त्यांचा निकाल लावण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here