ऊस शेतकर्‍यांना दिलासा: मुख्यमंत्र्यांनी शुगरफेडला थकबाकी भागवण्याचा दिला आदेश

चंदीगड : शेवटी पंजाब चे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गुरुवारी सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना थकीत 299 करोड रुपयांपैकी 149 करोड रुपये भागवण्याचे आदेश शुगरफेडला दिले आहेत. शुगरफेड, सहकारी साखर कारखान्यांचा प्रमुख समुदाय आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर वित्त विभागाने सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची थकबाकी भगावण्यासाठी 150 करोडरुपये मंजूर केले, तर 149 करोड रुपयांचा उर्वरीत थकबाकी शुगरफेड करुन केली जाईल.

सीएम यांनी सहकारमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना सांगितले की, थकबाकी भागवण्यासाठी ते आर्थिक रुपात व्यवहार्य तंत्र तयार करतील जेणेकरुन भविष्यात अशा स्थितीला थांबवण्यात येवू शकेल आणि शेतकर्‍यांना वेळेवर पैसे मिळतील. मुख्यमंत्र्यांनी खाजगी साखर कारखान्यांनाही शेतकर्‍यांची प्रलंबित थकबाकी लववकरात लवकर संपवण्याचे निर्देश दिले आहेत.

काँग्रेस चे राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी गेल्या आठवड्यात पंजाबच्या आपल्याच पक्षाच्या तीन आमदारांसह राज्यातील ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भगावण्यात झालेल्या विलंबाचा प्रश्‍न उपस्थित केला, आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याकडे थकबाकी भागवण्याची मागणी केली होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here