पंजाब: ऊस दरवाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत

जालंधर : राज्य सरकारने ऊसाच्या किमान दरात (एसएपी) केलेल्या वाढीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. हा सामूहिक संघर्षामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यासह धनोवली रेल्वे ट्रॅक आणि जालंधर फगवाडा हावयेवर सुरू असलेले आंदोलनही थांबविण्यात आले. आम्ही एक सामूहिक आंदोलन केले आणि उसाचा दर किमान ३६० रुपयांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो असे शेतकऱ्यांनी सांगितले.

आता संयुक्त किसान मोर्चाचे (एसकेएम) उद्दीष्ट दिल्ली, हरियाणाच्या सीमेवरील आपले आंदोलन अधिक तिव्र करण्याचा आहे. शेतकरी नेत्यांनी सर्व सर्व आंदोलनकर्त्यांना दिल्लीत जाऊन आंदोलन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. विविध राज्यांतील हजारो शेतकरी किसान संयुक्त मोर्चाच्या दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सिंधू सीमेवर होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी नोंदणी करण्यात आली आहे. एसएमकेने आंदोलनाला गती देण्यासाठी २६ आणि २७ ऑगस्ट असे दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here