पंजाबच्या सहकार मंत्र्यांनी साखर निर्यात अनुदानामध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेतील कमीबाबत व्यक्त केली नाराजी

चंदीगढ: साखरेवर निर्यात अनुदान गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात कमी देण्यावर पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याला अनुचित असल्याचे सांगून त्यांनी केंद्र सरकारला अपील केले की, त्यांनी आपला निर्णय लगेच रद्द करावा. रंधावा यांनी सांगितले की, ऊसाची शेती करणारे शेतकरी आणि कारखाने यापूर्वीच आर्थिक घाट्यामध्ये आहेत आणि त्यांना काही दिलासा देण्याची गरज आहे.

मंत्री रंधावा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने वर्ष 2019-20 साठी साखर कारख़ान्यांना 10.44 रुपये प्रति किलो दराप्रमाणे निर्यात अनुदान प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे साखर कारखान्यांना 6,828 करोड रुपयांची मिळकत झाली होती. पण आता हा निधी कमी होवून 3,500 करोड रुपये करण्यात आला आहे. रंधावा यांनी सांगितले की, या निर्णयाने मोठ्या प्रमाणात अस शेतकर्‍यांच्या थकबाकी भागवण्यावर प्रतिकूल परिणाम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here