ऊसतोड मजूरांना कारखाना परिसरातच क्वारंटाईन करा: साखर आयुक्त सौरभ राव यांचे आदेश 

कोल्हापूर, ता. 31: राज्यातील साखर हंगामा अंतिम टप्प्यात आहे. बहुसंख्य साखर कारखाने बंद झाले आहेत, तर काही कारखान्यांवरील मजूर आणिक कामगारांना संचारबंदीतही काम करावे लागत आहे. यासाठी, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी कारखाने सुरू आहे. त्या ठिकाणच्या सर्व मजूर व कामगारांना आपल्या गावाकडे पाठवू नये. याव्यतिरिक्त त्यांना कारखाना परिसरातच क्वारंटाईन करून ठेवावे असे आदेश विभागीय साखर आयुक्त सौरभ राव यांनी आज प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत.

सौरभ राव म्हणोल, राज्यातील लाखो मजूर आणि कामगार अजूनही कारखानास्थळावरच आहे. हजारो ऊस तोडणी मजुर आपल्या झोपडी किंवा पालामध्येच राहत आहेत. अशा सर्व मजूरांची व कामगारांची आरोग्य तपासाणी, स्वच्छ पाणी, जीवनावश्‍यक वस्तू, धान्याचा पुरवठा कारखान्यांनी केला पाहिजे. यामध्ये कसूर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली करणार असल्याचा इशाराही राव यांनी दिला. दरम्यान, हे सर्व आदेश सर्व जिल्हाधिकारी तसेच प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here