सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी, अनेक भागात अजूनही पाणी

सोलापूर: महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यांनी सांगितले की, एकट्या पंढरपुर तहसीलमध्ये 46 पूरग्रस्त प्रभावित गावातील 10,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थानावर घेवून जाण्यात आले आहे, तर महाराष्ट्राच्या या पश्‍चिमी जिल्ह्यामध्ये बुधवारी पावसामुळे संबंधित घटनांमध्ये 14 लोकांचा मृत्यु झाला आहे.

पंढरपुर तहसील चे उप मंडल अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले की, कालपासून पावसाच्या हालचालीत कमी आली आहे, पण उजनी सह अनेक बांधर्‍यांवर पाणी सोडल्यामुळे पंढरपुर तहसील च्या अनेक क्षेत्रांमध्ये पूराचे पाणी अजूनही कायम आहे.

त्यांनी सांगितले की, भीमा नदीच्या किनार्‍यावर स्थित गावातील 10,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थानांवर नेण्यात आले आहे.पंढरपूर मध्ये अनेक रस्त्यावरील पूल आताही पाण्या खाली आहेत , ज्यामुळे वाहनांच्या आवागमनावर परिणाम झाला आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, जिल्ह्यातील इतर भागांमध्ये 2,000 लोकांना सुरक्षित स्थानावर नेण्यात आले आहे. एकूण 4,865 कुटुंब प्रभावित झाली आहेत.
बडे यांनी सांगितले की, एकूण 18 बचाव दलांना पंढरपुर, माळशिरस , दक्षिण सोलापूर आणि मोहोळ सारख्या प्रभावित तहसीलमध्ये तैनात करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here