पाऊस परतला, आगामी तीन दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : जुलै महिना निम्मा संपला आहे. आणि महाराष्ट्रातील काही भागात अद्याप पावसाची गरज आहे. काही ठिकाणी पावसाची चांगली स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनची ताकद वाढली आहे. बंगालच्या खाडीत कमी दबावाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने १९ ते २२ जुलै या काळात राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र किनारपट्टीवर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीकामे खंडित झाली आहेत. पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांना पेरण्यांची चिंता भेडसावत आहे. गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २१ लाख हेक्टरमध्ये कमी पेरण्या झाल्या आहेत.

कमी पावसामुळे राज्यात आतापर्यंत केवळ ८३ लाख हेक्टरमध्येच पेरण्या झाल्याचे सांगण्यात येते. अद्याप ६० लाख हेक्टरमध्ये पेरण्या शिल्लक आहेत. राज्यात यंदा चार दिवस उशीरा मान्सून आला आहे. याशिवाय तो सर्वत्र पसरण्यास उशीर झाला आहे. २५ टक्के कमी पावसामुळे आतापर्यंत ५८.६४ टक्के पेरण्या झाल्या असून अद्याप ४२ टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या आठवडाभरानंतर शुक्रवारी सकाळी कोकण विभागात मान्सून पुन्हा सक्रीय झाला. आता तो महाराष्ट्राच्या इतर विभागात दिलासा देईल असे हवामान तज्ज्ञांचे अनुमान आहे. पुढील पाच दिवसात कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here